अहमदनगर महापालिकेने १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यत विविध कारचा एक रकमी भरणा केल्यास ७५ % शास्ती माफी लाभ देण्याबाबततचा निर्णय जाहिर केलेला आहे. या निर्णयास शहरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला असून ते करांचा भरणा करीत आहेत.
          नागरिकांनी अनेक वर्षापासून घरपटटी बाबत तक्रार अर्ज दिलेले आहेत. ज्यात प्रामुख्याने घरपटटीची फाळणी करणे, नळ कनेक्शन नसतांनाही नळपटटीची आकारणी करणे, घर पडलेले असतांनाही घरपटटीची आकारणी कमी न होणे अशा प्रकारच्या विविध तक्रारींचा समावेश आहे.तक्रारी बाबत नागरिकांनी अर्ज केल्यानंतरही त्यावर लवकर निर्णय होत नसल्याने अशा नागरिकांना शास्ती माफीचा लाभ मिळत नाही.यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत.
          या संबंधी अधिकाऱ्यांना भेटूनही याबाबत निर्णय होत नसल्याने घरपटटी वसुलीची थकबाकी वाढत आहे. याकरिता अधिका-यांची नेमणूक करणे आवश्यक आहे व तसेच नागरिकांनी दिलेल्या अर्जानुसार व कागदपत्रानुसार संबंधीत जबाबदारी सोपविलेल्या अधिका-यांनी तात्काळ निर्णय दिल्यास घरपटटीचा भरणा वाढण्यास मदत व नागरिकांच्या समस्या सुटतील.
           याकरिता शास्ती माफीची मुदतीस वाढ देणे आवश्यक आहे तसेच या संगणक प्रणाली मध्ये रोख अथवा चेकची एकच पावती होत असल्याने वसुलीस अडथळे निर्माण होत असल्याने या प्रणालीमध्ये सुधारण करणे आवश्यक आहे. तरी नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लागण्याकरीता समिती तातडीने निर्माण करण्यांत येउन नागरीकांच्या समस्येचे निराकरण होण्याकरीता आवश्यक ते कागदपत्रे घेण्यात यावे व जागेवरच तात्काळ निर्णय देणेबाबतचे कार्यवाही करण्यात यावी तसेच संगणक प्रणाली मध्ये नागरिकांच्या येणा-या समस्येचे निराकरण करण्यात येउन शास्ती माफीची मुदत वाढविणेबाबत लवकरात लवकर निर्णय महानगरपालिकेच्या हिताच्या दष्टीने घेण्यात यावा असे निवेदन अहमदनगर महापालिका आयुक्त यांना नगरसेविका सौ. सोनाबाई शिंदे व उपमहापौर सौ मालनताई ढोणे यांनी दिले असुन शास्ती माफीची मुदत वाढविणेबाबत लवकर निर्णय घेण्यात यावा असे नमुद केले आहे.