लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३९ हजार ००४ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २९ कोटी ३७ लाख ७६ हजार ७८२ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
           राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २ ऑक्टोबर या कालावधीत

          पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३६९ (८९८ व्यक्ती ताब्यात)

          १०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १३ हजार ६०१

          अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७

          जप्त केलेली वाहने – ९६, ३५२

           कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील २२५ पोलीस व २५ अधिकारी अशा एकूण २५० पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला.
           पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
           कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

आणखी बातम्या

काशी और मथुरा पर शुरू हुई चर्चाओं पे मा.शरदरावजी पवार ने जताई चिंता ।

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला वनाधिकार नियमात महत्वपुर्ण बदल.

नगराध्यक्षा बहिणीने मंत्री असलेल्या भावाकडे ‘मराठा आरक्षण मिळाले पाहिजे’ अशी मागितली ओवाळणी.

भाजपा शेवगाव तालुका यांच्या तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी.