अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत १०३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ४६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.६२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७५३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३६५७ इतकी झाली आहे.
           जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २३८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९४ आणि अँटीजेन चाचणीत ३२१ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५७, अकोले ३५, जामखेड ०६, कर्जत ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण १०, नेवासा ०३, पारनेर १५, पाथर्डी २३, राहाता १०, राहुरी ०१, संगमनेर ०५, श्रीगोंदा ६६, कॅंटोन्मेंट ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १९४ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ७५,जामखेड ०८, कर्जत ०४, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण १९, नेवासा ११, पारनेर ०७, पाथर्डी ०५, राहाता २५, राहुरी १२, संगमनेर ०६, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ११ आणि कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.अँटीजेन चाचणीत आज ३२१ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २६, अकोले २१, जामखेड ४७, कर्जत ०९, कोपरगाव १२, नगर ग्रामीण ०८, नेवासा १८, पारनेर १५, पाथर्डी १९, राहाता २३, राहुरी ३२, संगमनेर ३१, शेवगाव १९, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर २५, कॅन्टोन्मेंट ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           दरम्यान, आज १०३१ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. मनपा १७१, अकोले ६७, जामखेड ३९, कर्जत ४४, कोपरगाव ४३, नगर ग्रा. ६७, नेवासा ७१, पारनेर ५७, पाथर्डी ३३, राहाता ८४, राहुरी ६०, संगमनेर ९४, शेवगाव ४३, श्रीगोंदा ३३, श्रीरामपूर ११३, कॅन्टोन्मेंट ०९, मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

   बरे झालेली रुग्ण संख्या: ४२४६४
   उपचार सुरू असलेले रूग्ण: ३६५७
   मृत्यू: ७३६
   एकूण रूग्ण संख्या: ४६८५७

   (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आणखी बातम्या

खराब झालेल्या काटवन खंडोबा रस्त्याला मनसेने दिले खासदारांचे नाव.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला वनाधिकार नियमात महत्वपुर्ण बदल.

हाथरस घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने कॅन्डल मार्च, खटला युपीच्या बाहेर चालवण्याची मागणी.

राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची मा. आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी.