अहमदनगर जिल्ह्यात आज दि. १७ सप्टेंबर२०२० रोजी, रात्री ७-३० वाजेपर्यंत ५७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९२२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५०८१ इतकी झाली आहे.
          जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २९३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३० आणि अँटीजेन चाचणीत २९९ रुग्ण बाधीत आढळले.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८५, संगमनेर ०३, राहाता ०१, पाथर्डी ०२, श्रीरामपूर १४, नेवासा २३, श्रीगोंदा ०४, पारनेर ०६, अकोले १५, राहुरी ०८, कोपरगाव ०७, जामखेड ०२, मिलिटरी हॉस्पिटल २१, इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
          खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३३० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ११३, संगमनेर ०८, राहाता ५०, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण १७, श्रीरामपुर ४८, नेवासा १०, श्रीगोंदा ०८, पारनेर १४, अकोले ०९, राहुरी २३, शेवगाव ०१, कोपरगाव १६, जामखेड ०२ आणि कर्जत ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज २९९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा १९, संगमनेर २१, राहाता २०, पाथर्डी २६, नगर ग्रामीण १५, श्रीरामपूर १८, कॅंटोन्मेंट ०४, श्रीगोंदा २२, पारनेर १०, अकोले १६, राहुरी ४१, शेवगाव ३८, कोपरगाव १३, जामखेड २६ आणि कर्जत १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
           दरम्यान, आज ५७३ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १६९, संगमनेर ५०, राहाता १९, पाथर्डी १९, नगर ग्रा २५, श्रीरामपूर २६, कॅन्टोन्मेंट ०५, नेवासा ५१, श्रीगोंदा ४२, पारनेर २८, अकोले १६, राहुरी २३, शेवगाव ४५, कोपरगाव २७, जामखेड ११, कर्जत १६, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

   बरे झालेली रुग्ण संख्या: २९०८५
   उपचार सुरू असलेले रूग्ण: ५०८१
   मृत्यू: ५४९
   एकूण रूग्ण संख्या: ३४७१५

   (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आणखी बातम्या

जनता कर्फ्यू बाबत निर्णयाचा चेंडू स्थानिक नेत्यांच्या कोर्टात.

जनऔषधि केंद्रांची संख्या 10,500 पर्यंत वाढवण्याचे सरकारचे लक्ष्य

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी होऊ या!

कांग्रेस प्रदेशअध्यक्ष मा.सत्यजित तांबे यांच्या मा.नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन अनोख्या शुभेच्छा.