नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गांच्या दुरावस्थेप्रकरणी महापौर मा. बाबासाहेब वाकळे यांनी अधीक्षक अभियंता (सा.बा.वि. नगर) यांना पत्र पाठवले आहे. पत्रामध्ये त्यांनी रस्‍ते तातडीने दुरूस्‍त करा अन्यथा काळे फासण्‍यात येईल, असा इशारा दिला आहे.
           पत्रामध्ये महापौर यांनी लिहले आहे कि ‘कळविण्‍यांत येते की, अहमदनगर शहरातून जाणा-या मनमाड ,पुणे, औरंगाबाद, सोलापूर , कल्‍याण या महामार्गावरून मोठया प्रमाणात वाहनांची ये जा होत असते. सदरचे महामार्ग हे शहरातून जात असल्‍याने शहरातील नागरिकांना अनेक समस्‍यांना तोंड दयावे लागत आहे. या चारही महामार्गावरील रस्‍ते अत्‍यंत खराब झालेले आहेत. कल्‍याण मार्गे शहरातून जाणारा उड्डानपुलापासून नेप्‍ती नाक्‍यापर्यत रस्‍ता अत्‍यंत खराब झालेला आहे. या रस्‍त्‍यावर मोठ मोठ खड्डे पडलेले आहेत. या भागामध्‍ये मोठी लोकवस्‍ती आहे त्‍यामुळे शहरामध्‍ये अपघात होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. सदरचे रस्‍ते तातडीने दुरूस्‍त होणे आवश्‍यक आहे. सदर रस्‍ते अनेक दिवसा पासून खराब झालेले असून देखील आपण व आपल्‍या अखत्‍यारीतील अधिका-यांनी याबाबत कोणतीही कारवाई केल्‍याचे दिसून येत नाही. आपण व आपले अधिकारी नागरिकांच्‍या जिवाशी खेळण्‍याचा प्रयत्‍न करित आहे. शहरातील नागरिक रोज आमच्‍याकडे फोनद्वारे, निवेदनाद्वारे रस्‍ते दुरूस्‍ती करणे बाबत तक्रारी क‍रित आहेत. त्‍यामुळे सदरचे रस्‍ते दहा ते पंधरा दिवसामध्‍ये दुरूस्‍त करण्‍यात यावे. अन्‍यथा आपल्‍याला कार्यालयामध्‍ये बसून देणार नाही. व कोणत्‍याही क्षणी काळे फासण्‍यात येईल. याची नोंद घ्‍यावी.’

आणखी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार ४४८ रुग्ण बरे होऊन परतले घरी.

मराठा आरक्षणासंदर्भात भा.ज.पा. शिष्टमंडळाची खा. छत्रपती संभाजीमहाराज ह्यांच्या सोबत चर्चा.

अन्यथा सर्व महामार्गावर रास्तारोको – श्री. मनोज कोकाटे

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांकडे मागणी, ‘कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने रद्द करावा.’