अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ९३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९०० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४१४६ इतकी झाली आहे.
           जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२४ आणि अँटीजेन चाचणीत ६०० रुग्ण बाधीत आढळले.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४२, पाथर्डी ०९, नगर ग्रामीण ०१, श्रीरामपूर ०२, नेवासा ०५, श्रीगोंदा ०६, पारनेर ०३, राहुरी ०३, कोपरगाव ०३ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २२४ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ४०, संगमनेर १४, राहाता १९, पाथर्डी ०६, नगर ग्रामीण २९, श्रीरामपुर ३४, नेवासा ११, श्रीगोंदा ०२, पारनेर २३, अकोले ०३, राहुरी २२, शेवगाव ०३, कोपरगाव १० आणि जामखेड ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ६०० जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १६२, संगमनेर ४४, राहाता ५१, पाथर्डी ५२, नगर ग्रामीण २१, श्रीरामपूर २४, कॅंटोन्मेंट १३, नेवासा १३, श्रीगोंदा १६, पारनेर ३१, अकोले ३१, राहुरी २३, शेवगाव १०, कोपरगाव ३९, जामखेड ३१, कर्जत २८, मिलिटरी हॉस्पिटल ०८ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           दरम्यान, आज ९३३ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २५०, संगमनेर ५५, राहाता ८७, पाथर्डी ३५, नगर ग्रा. २९, श्रीरामपूर ९६, कॅन्टोन्मेंट ०६, नेवासा ४७, श्रीगोंदा २८, पारनेर ५४, अकोले ३६, राहुरी ३६, शेवगाव ४१, कोपरगाव ४७, जामखेड ४४,कर्जत ३३ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

   बरे झालेली रुग्ण संख्या: ३३३८१
   उपचार सुरू असलेले रूग्ण: ४१४६
   मृत्यू: ६३२
   एकूण रूग्ण संख्या: ३८१५९

   (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आणखी बातम्या

मराठा आरक्षण संदर्भात भा.ज.पा.शिष्टमंडळाची खा.छत्रपती संभाजीमहाराज ह्यांच्या सोबत चर्चा.

अन्यथा सर्व महामार्गावर रास्तारोको – श्री. मनोज कोकाटे

रस्‍ते तातडीने दुरूस्‍त करा, अन्यथा काळे फासण्‍यात येईल ! महापौर वाकळे यांचा इशारा.

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांकडे मागणी, ‘कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने रद्द करावा.’