कोरोना महामारीमुळे देश व देशाअंतर्गत व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक अडचणींला सामोरे जावे लागत आहे. त्या अंतर्गत सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना काही नियमांच्या आधीन राहून परवानगी देण्यात आली. परंतु त्यास पुरक असणारा साऊंड, लाईट, जनरेटर, मंडप ह्या व्यावसायिकांचा व्यवसाय अजून ठप्प आहे. यामुळे या सेवा देणारे लोक प्रभावित होऊन आर्थिक अडचणीत आहेत.
           आज मा. आ. रोहित पवार यांनी गृहमंत्री मा. अनिल देशमुख व सांस्कृतिक कार्यमंत्री मा. अमित देशमुख यांची भेट घेऊन साऊंड, लाईट, जनरेटर, मंडप ह्या व्यावसायिकांसाठी एक नियमावली बनवून त्या अधीन त्यांना येत्या काळात परवानगी द्यावी अशा मागणीचे निवेदन दिले. त्यांनी हि महिती ट्वीटर वर दिली आहे.

कोरोनामुळं साऊंड, लाईट,जनरेटर, मंडप व्यावसायिकांचा व्यवसाय गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प आहे.त्यांच्यासाठी एक नियमावली बनवून त्या अधीन त्यांना येत्या काळात परवानगी द्यावी,या मागणीसाठी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP साहेब व सांस्कृतिक कार्यमंत्री @AmitV_Deshmukh साहेबांना निवेदन दिलं. pic.twitter.com/WbRve991lf

— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 23, 2020

          तसेच राज्यात काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर, उडीद, सोयाबीन आदी खरीप पिकांचं नुकसान झालं. याबाबत पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत यासाठी कृषिमंत्री मा. दादासाहेब भुसे यांचीदेखील भेट मा. आ. रोहित पवार यांनी घेतली. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मंत्री महोदयांनी दिलं आहे.

राज्यात काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर, उडीद, सोयाबीन आदी खरीप पिकांचं नुकसान झालं. याबाबत पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत यासाठी कृषिमंत्री @dadajibhuse साहेबांची भेट घेतली. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मंत्री महोदयांनी दिलं. pic.twitter.com/k5TGkFdSmZ

— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 23, 2020

आणखी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत ९२३ बाधितांची भर.

मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा ! राज्य शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय.

रस्‍ते तातडीने दुरूस्‍त करा, अन्यथा काळे फासण्‍यात येईल ! महापौर वाकळे यांचा इशारा.

अहमदनगर येथील के के रेंज येथे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राचे सफल परीक्षण.’