अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून कपाशी, बाजरी ,सोयाबीन ,तूर ,मुग ,या सह अन्य पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे आधीच शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली असून त्याकडे प्रशासनाने मात्र पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांच्या हातात एकाही रुपयाचे पीक पदरी पडणार नाही, अशी अवस्था सद्यस्थितीत आहे. सर्वसामान्य शेतकरी कर्जबाजारी झालेला असून बहुतांश शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज व बँकेचे कर्ज घेऊन शेती पिकवली होती.
           अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पूर्ण पीक वाया गेलेले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता व शेतकरी त्रस्त झाले असून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी. असे निवेदन छत्रपती युवा सेनेच्या वतीने माननीय तहसीलदार श्री.रुपेशकुमार सुराणा, नेवासा यांना देण्यात आले. अतिवृष्टीमुळे पिकांची झालेले नुकसानीचे पंचनामे न झाल्यास छत्रपती युवा सेनेच्या वतीने तीव्र प्रकारच्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेना प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र नवथर (सर), तालुकाप्रमुख निलेश महाराज कडू विद्यार्थी आघाडी तालुकाप्रमुख कृष्णा नवथर, उपतालुका प्रमुख गणेश नवथर ,तालुका सरचिटणीस बाबासाहेब सरकाळे ,भीमराव सूर्यवंशी ,आकाश नवथर ,प्रो सोपान नवथर व अनेक शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

आणखी बातम्या

अहमदनगर मनापा स्वीकृत सदस्य निवड, ऑनलाईन पध्दतीने होणार सभा.

मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा ! राज्य शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय.

पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित नगर शहर भाजपा तर्फे वृक्षारोपण.

मा. आ. अनिल भैय्या राठोड यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन.’